नागरिकांची सनद

भारत सरकार

महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, 2005 हा दिनांक 1 जुलै, 2006 पासून राज्यात लागू करण्यात आला आहे. सदरहू अधिनियमातील कलम 8 (1) व (2) नुसार प्रत्येक कार्यालयाने किंवा विभागाने नागरिकांची सनद तयार करून ती प्रसिद्ध करण्याची कार्यवाही करावयाची आहे.

त्यानुसार शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशानुसार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयासाठी तयार करण्यात आलेली नागरिकांची सनद संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे.